दिनांक
: १३ एप्रिल २०२१ ( मंगळवार )
स्थळ :श्री विश्वरूप हॉल ,९३,ज्योतीनगर,औरंगाबाद
• या कार्यक्रमात :
१) कार्यक्रमाच्या सुरवातीलाच परिचयाची कार्यपद्धती सांगितली जाते ती नीट ऐकावी .
२) वधु-वरांचे नाव व क्रमांक उच्चारले जाताच त्यांनी पालकांसह माईकवर यावे . वधु -वरांनी फक्त आपले नाव व शिक्षण सांगायचे . अपेक्षा व इतर परिचय भावबंधन देईल .
३) परिचय चालू असताना इतरांनी आपल्या पाल्यास अनुरूप स्थळांचे नाव व क्रमांक लिहून घायचे आहेत .
४) मध्यंतरात याच क्रमांकाने माईकवरून आवाहन करून एकमेकांशी संपर्क करायचा असतो .
५) भावबंधनच्या वर्गणीदारांनी किंवा वर्गणीदार नसलेल्यांनाही या कार्यक्रमात सहभागी होता येईल .
• हे सर्वांत महत्त्वाचे :
१) वधु-वर यांची उपस्थिती अनिवार्य आहे . (त्याशिवाय प्रवेश नाही ) ज्यांचा मुलगा किंवा मुलगी परदेशात आहे अशा पालकांनाच पूर्वसंमतीने उपस्थिती राहता येईल .
२) कार्यक्रमात संपूर्ण शांतता व शिस्त राखणे .
३) मेळावा संपेपर्यंत थांबणे .
४) मेळाव्यानंतर भावबंधनशी संपर्कात राहणे .
५) विवाह जुळल्याची सूचना भावबंधनला त्वरीत देणे .
६) कृपया लहान मुलांना सोबत आणू नये .
७) वैयक्तिक फोटोग्राफी,शुटिंग करू नये. त्यासाठी भावबंधनचा अधिकृत फोटोग्राफर आहे .
• कार्यक्रमाचे वेळापत्रक :
१) १२:०० ते ६:०० वधु-वर परिचय .
२) ३:०० ते ६:०० निवडलेलया अनुरूप वधु-वर त्यांच्या कुटंबीयांची भेट व परस्पर परिचय .
३) भावबंधनचे वर्गणीदार, यापुर्वी नोंदणी केलेल्य सदस्यांनाही शुल्क देणे आवश्यक आहे .
४) या कार्यक्रमास वधु/वर,त्यांचे पालक यांनाच प्रवेश देण्यात येईल.